Author: विजयराज आरकडे

स्व. विमलताई यांनी केजला नगरपंचायत दर्जा मिळवून दिला होता आता त्यांच्या सुन आ. नमिताताई मुंदडा नगरपालिकेचा दर्जा मिळवून देणार आ. नमिता मुंदडा यांची विधिमंडळात मागणी केज / प्रतिनिधी :- शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अस्तित्वात असलेली नगरपंचायत नागरिकांना सुविधा देण्यात कमी पडत आहे विकासाचे प्रश्न मिळणाऱ्या तोकड्या निधीमुळे प्रलंबित आहेत म्हणून केजला नगरपालिकेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी विधिमंडळात केली आहे 2009 साली केजच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले त्यावेळी केजच्या विकासाला चालना मिळेल असा अंदाज होता परंतु तसे होत नसल्यामुळे शहराच्या विकासाची अनेक प्रश्न प्रलंबित राहिली आहेत त्यातच आता शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे त्यामुळे…

Read More

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन; देशमुख हत्या व परभणीतील येथील दोषींवर कठोर कारवाई करावाईची मागणी; बीड (प्रतिनिधी) केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करावे तसेच परभणी येथील आंदोलनकर्ते व संविधानरक्षक ॲड. सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेत दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ बिग्रेडच्या वतीने पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बीड येथे मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ बिग्रेडच्या वतीने पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जाहिर निषेध करण्यात येत आहे.तसेच परभणी येथील पोलीस…

Read More

आता संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जाणार लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि बँकेचे पास बुक व मोबाईल क्रमांक तलाठ्याकडे द्यावेत अन्यथा अनुदान बंद होईल — तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आवाहन गौतम बचुटे/केज – केज तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, बँकेचे पास बुक व मोबाईल नंबर हे त्यांच्या तलाठ्याकडे जमा करण्याचे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे. तसेच सदर कागद पत्रे वेळेत सादर न केल्यास अनुदान बंद होणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. या बाबतची माहिती अशी…

Read More

केज तहसीलवर सर्व दलित संघटनांचा आक्रोश मोर्चा सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांना मदत करणाऱ्यांना कठोर शासन करा गौतम बचुटे/केज :- परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या खुनातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याशी संबंधित सर्व गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे. यासाठी केज येथे सर्व दलित संघटनांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. या बाबतची माहिती अशी की, परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या जमावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. त्यात कायद्याचे शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच केज तालुक्यातील…

Read More

Briliyance Proactive Abacus class चे घवघवीत यश केज- 9.12.2024 रोजी बीड येथे झालेल्या नॅशनल Abacus Competition  विभागीय पातळी वरील Abacus स्पर्धेत केज येथील Briliyance Proactive Abacus class चे घवघवीत यश. सदर स्पर्धेत क्लासचे 25 विद्यार्थी बसले होते, पैकी दुर्वा दिलीपराव अंधारे व दक्ष विजया काळे यांनी प्रथम पारितोषिक मिळवले तर  कृष्णा  दत्ता अंधारे, अली खमर कुरेशी, विराट विरेंद्र जोगदंड, श्रेयस अमोल पालवदे यांनी 4 थे तर उर्वरित 19 जणांनी 6 वे व 7 वे स्थान मिळवले व मेडल प्राप्त केले. तसेच  केंद्र चालक दिलीप अंधारे व चालीका वनिता अंधारे यांना बेस्ट सेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्वाचे सर्व स्तरातून…

Read More

30 दिवसात येडेश्वरी युनिट नं.1 चे 2 लाख गाळप पूर्ण केज (प्रतिनिधी) -आनंदगांव(सा) येथील येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.1 ने दि. 16. नोव्हेंबर 2024 रोजी 11 व्या गळीत हंगामाची सुरुवात केली. आणि आज 16 डिसेंबर 2024 रोजी कारखान्याने दोन लाख टन गाळप करून ठरवलेल्या उद्दिष्टाकडे योग्य रीतीने वाटचाल चालू आहे. कर्मचा-यांनी एकमेकांचे अभिनंदन करून आनंद साजरा केला.येडेश्वरीची प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात 16 नाव्हेंबर 2024 झाली होती. आज रोजी 30 दिवसांमध्ये कारखान्याने 2 लाख टन गाळप करून साखरेचे उत्पादन 87हजार 250 क्विंटल घेतले. कारखाना प्रतिदिवस 7000 मे टन सरासरी प्रमाणे गाळप करीत आहे. तसेच कारखान्याच्या आसवानी प्रकल्पात इथेनॉल 19 लाख 37 हजार…

Read More

सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात केज ! प्रतिनिधी : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. आरोपी विष्णू चाटे हा पोलिसांच्या ताब्यात आहे. ते स्वतः शरण आल्याचे समजते. हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी मधील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, आता चौथ्या आरोपीला अटक केलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या…

Read More

आज केज येथे दलित समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन; बंद पुकारला नसल्याने केज शहर सुरळीत चालू राहील केज/प्रतिनिधी आज बुधवारी केज येथे दलित समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सदर मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना दलित समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र बंदची हाक दिली नसल्याने सर्व व्यवहार,दुकाने, शाळा सुरू राहील असे कार्यकर्ते यांनी कळवले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक केज, येथून शहरातील मुख्य रस्त्याने दलित आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा…

Read More

संतोष देशमुख हत्याकांडाची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशा मार्फत व्हावी — रोहित पवार बीड जिल्ह्याचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे — आ. रोहित पवार गौतम बचुटे/केज :- संतोष देशमुख यांच्या हत्याकांड हे दुर्दैवी असून मास्टर माईंडला वाचविले जात असल्याचा आरोप रोहीत पवार यांनी सरकारवर केला. तर या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी त्यांनी केली. कारण एसआयटी आणि निव्वळ वेळ काढूनपणा असून अशा प्रकारच्या अनेक चौकशा होतात. परंतु पुढे काय होते हे आपण पाहिले आहे. असे ते म्हणाले. तसेच याचा तपास करण्यासाठी मुंख्यमंत्र्यानी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. दि. १७ डिसेंबर रोजी आ. रोहित पवार हे मस्साजोग येथील…

Read More

पंकजाताई मुंडे यांना भाजपाकडून मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता पक्षाकडून फोनवरून माहिती दिली असल्याची  चर्चा मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तीमत्व पंकजाताई मुंडे यांना भाजपा पक्षाकडून फोनवरून मंत्रीमंडळात समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली असल्याचे वृत्तवाहिनी वरून सांगण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रचाराने महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात सभा घेऊन आमदार निवडून आणले आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना राज्यातील मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे समजते.

Read More