संतोष देशमुख हत्याकांडाची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशा मार्फत व्हावी
— रोहित पवार
बीड जिल्ह्याचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे
— आ. रोहित पवार
गौतम बचुटे/केज :-
संतोष देशमुख यांच्या हत्याकांड हे दुर्दैवी असून मास्टर माईंडला वाचविले जात असल्याचा आरोप रोहीत पवार यांनी सरकारवर केला. तर या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी त्यांनी केली. कारण एसआयटी आणि निव्वळ वेळ काढूनपणा असून अशा प्रकारच्या अनेक चौकशा होतात. परंतु पुढे काय होते हे आपण पाहिले आहे. असे ते म्हणाले. तसेच याचा तपास करण्यासाठी मुंख्यमंत्र्यानी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
दि. १७ डिसेंबर रोजी आ. रोहित पवार हे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमख हत्याकांड प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन करण्यासाठी मस्साजोग येथे आले होते. या वेळी त्यांच्या सोबत माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी आ. सय्यद सलीम, सक्षणा सलगर, राजेसाहेब देशमुख, डॉ. नरेंद्र काळे, संजीवनी देशमुख, राधाताई सकपाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. रोहित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची चौकशी ही निवृत्त न्यायाधीश किंवा एखाद्या निःपक्षपातीपणे काम करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्या मार्फत केली जावी. कारण अशा एसआयटीच्या चौकशा म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा आहे. यापूर्वी अनेक प्रकरणात अशा चौकशा झाल्या आहेत परंतु त्याचे फलित काय? असे एसआयटी चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.
येथील यंत्रणा मास्टरमाईंड यांना वाचवण्याचे काम करीत असल्याचा जळजळीत आरोप त्यांनी केला.
————————————————
संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार :- आ. रोहित पवार यांनी संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी, मुलगी कु. वैभवी व मुलगा चि. विराज आणि आई शारदा आणि वडील पंडितराव देशमुख यांचे सत्वन केले. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला उघडे पडू देणार नसून त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी ते घेणार असल्याचे त्यांनी कबूल केले आहे.
