Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 2, 2026No Comments1 Min Read

हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची
दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती;

केज, दि. २ सप्टेंबर : केज शहरातील कानडी रोडवरून समर्थ नगरला जोडणाऱ्या नाल्याचे काम सुरू असतानाच नाला खचल्याने परिसरातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. कामाच्या दर्जाबाबत तसेच संबंधित गुत्तेदाराच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित करत यासंदर्भात वृत्तपत्रांमधूनही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर जनविकास आघाडीचे नेते हारूनभाई इनामदार व नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी व गुत्तेदार यांना कामाच्या दर्जाबाबत धारेवर धरत, नाल्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

या सूचनांची दखल घेत संबंधितांनी नाल्याचे काम पुन्हा सुरू केले आहे. त्यामुळे कानडी रोड व समर्थ नगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, रखडलेले काम मार्गी लागल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दर्जेदार काम होऊन वाहतूक सुरळीत व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 46
विजयराज आरकडे

Related Posts

कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम

September 1, 2026

अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट;

September 1, 2026

कानडी रोडच्या कामावरून व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी; ‘एक वर्षानंतरही रस्ता समाधानकारक का नाही?’

August 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 0 5 0
Total Users : 149050
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.