मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही योग्य कारवाई होत नाही- मनोज जरांगे पाटील
गौतम बचुटे/केज :-
देशमुख कुटुंबाला मुख्य मंत्र्यांनी एकही गुन्हेगार सुटणार आणि असा शब्द दिलेला असताना सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना मदत करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. किंवा त्यांना सहआरोपी केले जात नाही.
यावर मनोज दादा जरांगे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते मस्साजोग येथे गावकरी व स्व. संतोष देशमुख कुटुंबाच्या अन्नत्याग आंदोलनास भेट देण्यासाठी दि. २५ रोजी आले होते.
तसेच जर मुख्यमंत्री या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कमी पडत असतील; तर त्यांनी देशमुख कुटुंबाच्या आंदोलनात सहभागी होवून केंद्राकडे सखोल तपासाची मागणी करावी. अशी चपराक मुख्यमंत्र्यांना लगावली आहे. जर उपोषणार्थिंच्या जीविताला काही झाले तर गाठ महाराष्ट्रातील मराठ्यांशी आहे. असा दमही भरला आहे.