संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय हवा या मागणीसाठी जनसागर एकवटला
छत्रपती संभाजी राजे, जरांगे पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती
बीड –
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपींना अटक करून फासावर चढवा व या हत्येमागील सुत्रधार शोधून संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी आज दि. २८ रोजी बीड येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील जनसागर या मोर्चाला उपस्थित राहीला असल्याचे दिसून आले.
छत्रपती संभाजी राजे, मनोज जरांगे पाटील,
खा. बजरंग सोनवणे, मविआ चे आ. जितेंद्र आव्हाड, आ.सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके,
आ. संदीप क्षिरसागर,
आ. विजयसिंह पंडित,
तसेच जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मुक मोर्चाला सुरूवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करून जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
नंतर या आक्रोश मुक मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थित सर्वांनी फरार आरोपींना अटक करून या हत्येमागील मुख्य सुत्रधार जो कोणी असेल त्याच्यावर कारवाईची शासनाकडे मागणी केली.