न. प. ने घेतलेल्या सार्वजनिक बोअरवेलचे पाणी भरण्यासाठी नागरिकांना करावे लागते जुगाड
केज-
न. प. च्या वतीने गत काही महिन्यांपूर्वी अनेक वार्डात शिल्लक निधीतून बोअरवेल घेतले होते. वार्ड क्रमांक 4 मध्ये ही घेण्यात आले. सुदैवाने पाणी लागलेही नागरिकांना दिलासा मिळाला परंतु जवळपास वर्ष संपत आले अद्यापही तुट्या किंवा टाकी बसवण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक आप आपले जुगाड वापरून पाणी भरत आहेत.
ऐन उन्हाळ्यात देखील या बोअरवेल ने परिसरातील नागरिकांना पाण्याचा थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतू हंडा भर पाणी भरायचे म्हणले तरी तोटी नसल्याने पाणी वाया जात आहे. टाकी नसल्याने कोणीही, केंव्हाही बोअरवेल चालू करून पाणी भरतात त्यामुळे पाणी वाया जाण्याबरोबरच बोअर खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा महीना म्हणण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत काही नागरिकांनी दक्षता घेत हे बोअरवेल चे संरक्षण करून पाणी वापरले आहे. आता तर काही नागरीक मोठा पाईप वापरून सिनटेक्स भरून नंतर मोटार वापरून पाणी घरी पोहच करत आहेत.
न. प. सत्ताधारी व प्रशासनाने आता तरी पाण्याची टाकी बसवून परिसरात पाईपलाईन करून नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी असे नागरिक आशा करत आहेत. हे केले तरच या बोअरवेलला दीर्घायुष्य लाभेल अन्यथा अल्प आयुष्यात हे बोअरवेल खराब होऊन नागरिकांना हातचे आलेले पाणी सोडावे लागेल यात शंका नाही.
