औरंगपूर येथे पावनधामवर पंकजा मुंडे समोर आरक्षण समर्थकांनी काळे झेंडे दाखवून मराठा आरक्षण समर्थनार्थ घोषणाबाजी
——————————
स्वर्गीय मुंडे साहेब यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी द्या_____
पंकजाताई मुंडे
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील औरंगपुर येथे असलेल्या पावनधाम येथे तुकाराम बीज निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षण समर्थक आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.
या बाबतची माहिती अशी की, दि. २७ मार्च रोजी दुपारी १:३० वा. च्या सुमारास भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाजोगाई-कळंब रोडवर असलेल्या औरंगपूर येथील पावनधाम येथे तुकाराम बिज निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्या नंतर त्या शेजारच्या सभामंडपात मठाधिपती ह.भ.प. महादेव महाराज बोराडे यांचे सूरु असलेले कीर्तन ऐकण्यासाठी जात असताना मराठा आरक्षण समर्थक जमावातील कार्यकर्त्यानी त्यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा आशा घोषणा दिल्या. त्यामुळे तेथे काही काळ गोंधळाची व तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यावर सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मराठा आरक्षण समर्थक आणि कार्यकर्ते यांच्यात तणाव निर्माण होऊन त्याचा विपरीत परिणाम कायदा व सुव्यस्थेवर होण्याची भिती व्यक्त होत आहे.
—————+—————-
स्वर्गीय मुंडे साहेब यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी द्या_____
पंकजाताई मुंडे
दरम्यान या घटनेनंतर पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधतांना डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवा वज्रमूठ एक करून मतदानाचा असा ठोसा मारा ज्याचा आवाज संसदेत घुमला पाहिजे असे आवाहन केले.
मी राजकारण करताना कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. मी जेव्हा सत्तेत होते. तेव्हा प्रत्येक गावात विकासासाठी निधी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत मला विजयी करून देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी द्या. स्वर्गीय मुंढे साहेब यांचे अधुरे स्वप्न साकार करून जिल्ह्याचे नाव देशात उंच करून दाखवायचे आहे. असे आवाहन केले.
