रिक्षा पलटी होताच,रिक्षाने घेतला पेट;
नागरीकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
केज शहरात सांयकाळी ७ च्या सुमारास घडली घटना
केज-
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांयकाळी ७ च्या सुमारास एक तिन चाकी टमटम कळंब रोड कडे वळत असताना पलटी झाला. त्याच बरोबर रिक्षाने पेट घेतला, आणि रिक्षा सुरूच राहील्याने मोठा आवाज व धुराळा यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती व पाहणार्याची गर्दी यामुळे यामुळे एकच धावपळ नागरिकात पाहायला मिळाली, काही तरूणाने शर्तीचे प्रयत्न करून रिक्षा बंद केल्यास अखेर आवाज व धुराळा बंद झाला, रिक्षाचे मात्र नुकसान झाले असून तो कळंब तालुक्यातील अंधुरा मस्सा येथील असल्याचे समजते, सुदैवाने रिक्षाचालक याला इजा झाली नाही.
