दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने रंजित कांबळे यांनी केले गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप !
गौतम बचुटे/केज-
केज येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचे औचित्य साधून शिक्षणासाठी पायपीट कराव्या लागत असलेल्या गरजवंत विद्यार्थ्यांना दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने महाराष्ट्राच्या महागायिका कडुबाई खरात यांच्या उपस्थितीत संयोजक रंजित कांबळे यांनी सायकलींचे वाटप केले.
या बाबतची माहिती अशी की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्व वंदनीय भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीत आणि वंचित समाजाला सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ती जे प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असा मूलमंत्र दिला. तसेच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला.
दरम्यान आजही अनेक गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. अनेक गावात वाहनांची सोय नसते. या सर्व बाबींचा विचार करून दिपक भाऊ कांबळे युवा मंचचे संस्थापक रंजित कांबळे यांच्या संकल्पनेतून भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून दि. १० एप्रिल रोजी गरजू विद्यार्थ्यांना महात्मा फुले नगर येथे दिपक कांबळे, एल एफ सी ग्रुपचे कपिल मस्के महाराष्ट्राच्या महागायिका कडुबाई खरात यांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे, कडूबाई खरात, एल एफ सी ग्रुपचे कपिल मस्के, जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, तालुका सरचिटणीस पत्रकार गौतम बचुटे, जेष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव बनसोडे, सुदेश दादा सिरसट, रमेश निशिगंध, सुरज काळे, रोहीत कांबळे, राहुल काळे, हरीश गायकवाड, प्रशांत हजारे, रवी गायसमुद्रे, हरेंद्र तुपारे, दादाराव धेंडे, विनोद शिंदे, गौतम गंडले यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि माण्यवरांची उपस्थिती होती.
