स्वच्छता ही माझी जबाबदारी समजून कृतीशील व्हावे– -डॉ.हनुमंत सौदागर
केज –
साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे गांधी तिर्थ स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतचे महत्त्व व स्वच्छता आरोग्या साठी किती आवश्यक आहे विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाचे पुष्प गुंफताना प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांनी अस्वच्छता ही मानवनिर्मित घाण आहे तूज आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे स्वच्छतेची सुरुवात सर्वप्रथम स्वतहा पासून सुरू करायला पाहीजे भाषणे देऊन चालणार नाही या साठी आपण स्वतः कृती करायला पाहिजे.पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेसच निसर्गातच सर्वांची निर्मिती झाली आहे. मानव,झाडे झुडपे,पशु पक्षी, प्राणी इत्यादीची निर्मिती झाली परंतु मनुष्याच्या गरजा जरा जास्तच वाढल्याने सुंदर स्वच्छ पृथ्वीवर माणसाने अस्वच्छता निर्माण करु लागला. हा देश माझा या देशाचे जरा से भान राहु द्या रे या प्रमाणे आपण स्वतः स्वच्छते विषयी जागरूक राहिले पाहिजे स्वच्छते मुळे रोगराई कमी प्रमाणात होते.अस्वच्छ असलेल्या भागात आजारपण व रोगराईचे प्रमाण आपण जास्त पाहतो या स्वच्छता ठेवा रोगराई मुक्त रहा हा संदेश आपण स्वतः पाळा व आपल्या परिसरातील नागरिक यांना सुद्धा स्वच्छते विषयीचे महत्त्व सांगितले पाहिजे. तरच भारत देश महासत्ता होईल असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला कविता कराड (मुख्याध्यापक साने गुरुजी नि. शा.) सुवर्णा सिरसट मॅडम तसेच विद्यार्थी व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.