महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार राजू वंजारे यांना सा. न्या. मं. सचिव सुमंतजी भांगे यांच्या हस्ते सन्मानित करून प्रधान
बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा पुरस्कार अभिमानास्पद
बीड (प्रतिनिधी):-
महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण राज्य नामांकित पुरस्काराने बीडच्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक राजू पुंडलिकराव वंजारे यांचा राज्य शासनाच्या वतीने मंगळवारी सामाजिक न्याय मंत्रालयाचे सचिव श्री सुमंतजी भांगे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ही बाब अतिशय अभिमानास्पद असून बीड जिल्ह्याच्या येळंब घाट येथील अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या राजू पुंडलिकराव वंजारे या व्यक्तिमत्त्वाने एसटी महामंडळात मध्ये वाहक म्हणून नोकरी स्वीकारली पण समाजकार्यासाठी नोकरी सोडून त्यांनी मागील काही वर्षापासून बीड येथे जिव्हाळा बेगर निवारा केंद्राच्या माध्यमातून ज्या लोकांना घर नाही जे रस्त्यावर फिरून उदरनिर्वाह करतात त्यांना निवाराकेंद्रात आणून जगण्याची नवी उमेद देण्याचे अनोखे कार्य निस्वार्थ भावनेने केले. या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार क्रीडामंत्री संजय बनसोडे सामाजिक विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने प्रतिष्ठित असलेल्या राज्य शासनाच्या समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
एकूण 396 पुरस्काराचे मंगळवारी राज्यातील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या संस्था सामाजिक कार्यकर्त्यांचा राज्य शासनाच्या वतीने गौरव करण्यात आला. यामध्ये बीडच्या राजू पुंडलिकराव वंजारे यांना शासनाने हा पुरस्कार देऊन बीडच्या सामाजिक कार्याची दखल घेतली असून राजू पुंडलिकराव वंजारे यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्कारामुळे मंत्री रामदासजी आठवले, माजीमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर, शिवसंग्राम नेत्या ज्योतीताई मेटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, सचिन मुळुक सर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के सर, आरपिआयचे जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे सर,भगवान कांडेकर सर, माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर , न.प.मुख्यधिकरी निता अंधारे मॅडम, राहुल मस्के सर, अजय सवाई, प्रशांत वासनिक सर, नगर सेवक डॉ. योगेशभैया क्षीरसागर, सारिकाताई, गणेश वाघमारे, adv विकास जोगदंड, भैया मोरे, राजुभाऊ गुळभीले सर, अमोल बडगुजर,
बाबासाहेब कोकाटे, संतोष निकाळजे, जयवंत टेकाळे सर, राजकुमार कागदे, संपादक किशोर कागदे सर,, संपादक गंमत भंडारी , वैभव स्वामी, पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंढे, प्रेमचंद वंजारे, पोलीस, भगवान वांजरे सह शिक्षक,
लक्ष्मण वंजारे, सेवानिवृत्त शिवाजी वंजारे, प्रदीप वंजारे, सेवानिवृत्त मिठू वंजारे, नायब तहसीलदार अण्णा वंजारे आदींसह नातेवाईक स्नेहीजन मित्रपरिवारासह बीडकर नागरीकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. मंगळवारी मुंबई येथे संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिजीत वैद्य,वैभव स्वामी,शालिनी परदेशी, यश वंजारे, छाया सरोदे, कल्याण गोरे यांच्यासह वंजारे परिसरातील सदस्यांची उपस्थिती होती.
या पुरस्कार वितरणाचा नंतर राजु वंजारे म्हणाले की माझ्या या पुरस्कारात माझ्या परिवारासह अभिजित वैद्य, वैभव स्वामी, शालीनी परदेशी, छाया सरोदे, विठ्ठल वंजारे, बाळासाहेब वंजारे, राहूल वंजारे, गौतम वंजारे, मयूर चक्रे, ओम वंजारे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
