पंकज कुमावत व शंकर वाघमोडे यांनी जनताभिमुख काम करून केज तालुक्यात पोलिसांची प्रतिमा उंचावली
केज- धनंजय कुलकर्णी
पोलिस स्टेशन म्हणले की सामान्य नागरिकांना भिती वाटते त्यातही पोलिस स्टेशनची पायरी चढणे म्हणजे मान खाली घालण्याचा प्रकार असा सर्व साधारणपणे रुढ बनली आहे त्यातही पोलिस चांगल्या लोकाशी वाईट वागतात अन वाईट लोक व राजकारणी यांच्याशी पोलिसांची साठगाठ असतेच अस एक मतप्रवाह आहे आणी वाढती गुन्हेगारी हा जवळपास सर्व ठिकाणचा अनुभव बनलेला असताना केज पोलिसांना केज शहर व तालुक्यात गुन्हे व गुन्हेगारीवर आळा घालण्यात तसेच जनतेचा विश्वास संपादन करण्यात चांगले यश आले असे म्हणावे लागेल .
केज पोलिस ठाण्यात एपीआय शंकर वाघमोडे यांनी चार्ज घेतला व उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पंकज कुमावत यांनी चार्ज घेतल्यापासून तालुक्याच्या गुन्हेगारीत बरीच घट झाली आहे. प्रॉपर केज शहरातील गुन्हेगारीला आळा बसून मुलींच्या छेडछाडीच्या घटना , बलात्कार , विनयभंग , हाणामारी आदी सारखे गुन्हे खूप कमी झाले आहेत तर अवैध व्यवसाय वर वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या मधे पण पोलिसांची चांगलीच भिती बसली आहे .
चांगले अधिकारी असल्यास काय घडू शकत हे जर पाहिले तर एपीआय शंकर वाघमोडे यांनी केज पोलिस स्टेशनचा चार्ज घेतल्या नंतर पोलिसांच्या कामगिरी चांगली सुधारत गेली आणि जनते मध्ये मिसळून जनतेचा विश्वास संपादन करू
न जनता भिमुख काम केल्याने जनतेमध्ये पोलीस बद्दल पूर्वीची धारणा संपुष्टात आली आणि यातच उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांच्या धडाकेबाज कामगिरीनी तर अवघा मराठवाडा दणाणून सोडला .
केज पोलिस स्टेशनला गेल्यावर तक्रार घेऊन जाणाऱ्याची बाजू ऐकून घेतली जाते त्यानंतर पोलिस आपल्या पध्दतीने तक्रारीचे निवारण करतात यामधे तातडीने कारवाई होत असल्याने तक्रारदार व आरोपी दोघांनाही कायद्याचा सन्मानच पाहायला मिळतो . आरोपी कितीही हुशार असला किंवा त्याला राजकीय संरक्षण असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटत नाही हे आता सगळ्या केजला चांगलेच समजले आहे . शहरात अनेक शाळा कॉलेज असल्यामुळे व तसेच अनेक शिकवण्या चालू असल्यामुळे मोकार मुलांचा मुलीना त्रास असायचा परंतु शंकर वाघमोडे यांनी सोशल मिडीयावर वारंवार आवाहन केल्याने आणि स्वतः शाळेत,कॉलेज आणि शिकवणी वर्ग यांना भेटी देऊन मुलांना त्यांचा मोठा भाऊ म्हणून स्वतःचा मोबाईल नंबर देऊन कधीही अडचणी ची वेळी कॉल किंवा एसएमएस करणे चे सूचना दिल्या त्यामुळे पालकांना व मुलींना पण पोलिस कारवाई करतील अशी आशा निर्माण झाली आहे आणी मुलीचे छेड काढायची ठिकाणे कळाली माहिती मिळाली की तातडीने कारवाई पाहायला मिळायला लागली आणी मुलीच्या छेडछाडीवर पण बराच आळा बसला आहे . मुली व पालक सुध्दा थोडे सुखावले आहेत बदनामीच्या भितीने अनेक पालक व मुली पोलिसांना कटघरात उभा करत असत आता चांगलाच आळा बसत आल्याने रोडरोमियोना चांगलाच चोप पण मिळत आहे त्यामुळे वातावरणात अतिशय अमुलाग्र बदल घडत आहे व शहरातील परिस्थिती बदलत चालल्याची ही नांदी आहे .
२०२१ च्या तुलनेत २०२२ मधे अनेक गुन्ह्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे गंभीर गुन्ह्या चे गुन्हेगार शोधण्यात यश आले तसेच नागरिक गोळा करून तणाव निर्माण करणेचे प्रमाण खूपच कमी झाले तसेच अवैध व्यवसाय वर वारंवार कारवाई करत असल्यामुळे अवैध व्यवसाय वाले चांगलेच धास्तावलेले असतात .
अनेक गुन्हे दाखल होऊन बरेचसे गुन्ह्यात आरोपिताना अटक करून यशस्वी तपास केल्याचे दिसून आले आहे. तसेच प्रत्येक गुन्ह्यात तात्काळ आरोपी ताब्यात घेऊन कारवाई झालेली असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पोलिसाप्रती विश्वास निर्माण झालेला आहे . याबाबतीत पोलिसांचे निश्चितच कौतुक करायलाच हवे .
जनतेचा विश्वास कमावने हाच आमच्या साठी पुरस्कार आहे – शंकर वाघमोडे
२०२१ च्या तुलनेने २०२२ मध्ये केज पोलीस यांचे बद्दल वाढलेला विश्वास आणि आदर यावरून लक्षात येते की पोलिसांचे काम जनतेप्रती चांगले आहे . पोलिसांनी टीमवर्कने काम केले तर जनतेला त्रास होत नाही हेच यातून दिसून येते. आजकाल गुन्ह्याची पध्दत बदलली आहे आॕनलाईन गुन्हे वाढता आहेत यामधे मुलींना त्रास देण्याचे प्रमाण वाढले असून याबाबतीत वारंवार पोलिसाकडून आवाहन केले जाते की मुलीनी शक्यतो इंन्स्टाग्राम , वाटसप , फेसबुक आदी सोशल मिडीया च्या ॲपवर जास्त सक्रिय राहू नये तसेच अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये नाव मुलीचे असते हाय बाय पासून सुरू करून जवळीक साधून त्रास देतात अश्या पासून सावध रहावे तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यासोबत मित्र म्हणून राहून लक्ष देणे आवश्यक आहे असे वारंवार आवाहन केले जाते तसेच केज पोलीस यांचे कडे येणाऱ्या तक्रारीवर लागलीच कारवाई करण्यासाठी प्राधान्य असते त्यामुळेच नागरिकांना पोलिसा विषयी विश्वास वाढतो आहे . जनतेचा व पोलिसांचा चांगला समन्वय राहिल्यास गुन्हेगारीवर आळा बसतोच .
प्रत्येक पोलिस हा जनतेच्या सेवेसाठीच असतो निसंकोच पणे जनतेच्या तक्रारी घेऊन यावे आम्ही जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहोतच असे आश्वासन शंकर वाघमोडे यांनी दिले .
पोलिसावरील विश्वास वाढविण्यासाठी आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या सुचना सर्व वाटसप ग्रुपवर देतो मिडीयाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो व नागरिक प्रतिसाद देतात यामुळे चांगले वातावरण राहते व लोक आनंदी आणि समाधानी राहण्याचे प्रमाण वाढते .
