Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 30, 2024Updated:May 30, 2024No Comments2 Mins Read

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध

केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

केज-

महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये मनुस्मृति आणि रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्यात आल्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली आहे. या निर्णयाला विरोध म्हणून केज तालुका जिजाऊ ब्रिगेडने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीला विरोध करणारे निवेदन बीड जिल्हा अध्यक्षा राधाताई रामदास सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली केज येथे तहसील कार्यालयातील पेशकार नन्नवरे यांना निवेदन दिले.
मनुस्मृति हा हिंदू धर्मातील समस्त बहुजन समाजांचा अपमान करणारा आणि त्यांना हीन लेखनारा ग्रंथ आहे. तसेच मनुस्मृतीने हिंदु धर्मातील समस्त स्त्रियांना जनावरापेक्षाही खालचा दर्जा दिलेला असून स्त्रियांना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार नाकारले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांना सुद्धा मनुस्मृतीचा आधार घेऊनच प्रचंड, विरोध झालेला आहे. सावित्रीबाई फुले यांनी सुरू
केलेल्या शैक्षणिक कार्यालासुद्धा मनुस्मृतीचा आधार घेऊनच प्रतिगाम्यांनी विरोध केलेला होता. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन रायगडाच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते.
अशा विषमतावादी ग्रंथातील श्लोक विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्या मनात जातीयवाद आणि विषमता सरकारला निर्माण
करायची आहे का? असा प्रश्न जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी या निवेदनाद्वारे शासनाकडे विचारला आहे. तसेच रामदास स्वामीचा ‘दासबोध’ हा ग्रंथसुद्धा विषमता निर्माण करणारा असून त्या ग्रंथामध्ये गुरूंची लक्षणे’ या अध्यायात बहुजन समाजाला अध्ययन आणि अध्यापन करण्याचा अधिकार नाकारलेला आहे, त्यामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने या दोन्ही ग्रथांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याला जाहीर विरोध करण्यात येत आहे. तुकोबांची अभंगगाथा, राष्ट्रसंतांची ग्रामगीता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करावे अशी मागणी निवेदनात केली आहे. सरकारने आमच्या मागणीचा ताबडतोब विचार करुन अभ्यासक्रमातून मनुस्मृती आणि दासबोध ताबडतोब हटवावे. अन्यथा जिजाऊ ब्रिगेडला शिक्षण विभागावर मोर्चा नेऊन संपूर्ण महाराषट्रभर तीव्र आंदोलन उभे करेल, असा ईशाराही बीड जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या बीड जिल्हाध्यक्ष राधाताई रामदास सपकाळ , अविधा बाळासाहेब शिंदे , आम्रपाली संजय सोनवणे,
यांच्यासह इतर माता-भगिनी उपस्थित होत्या.

विजयराज आरकडे

Post Views: 133
विजयराज आरकडे

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम

May 28, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.