एच.पी.एम कंपनीच्या अर्धवट आणि निकृष्ट कामासंदर्भात अशोक काळकुटे यांचे खा.प्रितम मुंडेना निवेदन.
बीड | प्रतिनिधी.
एच.पी.एम कंपनीच्या निकृष्ट आणि अनियोजित अर्धवट कामासंदर्भात छावा चे अशोक काळकुटे यांनी आज खा. प्रितम मुंडे यांना निवेदन देऊन कारवाई ची मागणी केली आहे तसेच अर्धवट राहिलेले काम तात्काळ मार्गी लावावे अशीही विनंती केली आहे.
अहमदनगर-अहमदपुर राष्ट्रीय महामार्ग (५४८-बी) या सिमेंट रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. यामध्ये बीड तालुक्यातील मांजरसुंबा-केज दरम्यान एच.पी.एम या कंपनीच्या निकृष्ट, अर्धवट आणि अनियोजित कामामुळे अनेकांना अपघातात आपला जिव गमवावा लागला आहे. याप्रकरणी एच.पी.एम कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी छावाचे अशोक काळकुटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
काम पुर्ण झालेले नसताना वैद्यकिन्ही टोल वर सुरू करण्यात आलेली टोल वसुली तात्काळ थांबवावी तसेच येळंब (घाट) येथे उड्डाणपूलाचे अर्धवट असलेले काम पुर्ण करण्यास आदेश द्यावेत आणि ठिकठिकाणी पथदिवे, सर्व्हिस रोड, गावात आणि वस्त्यांकडे जाणारे खोदुन टाकलेले रस्ते, श्री. क्षेत्र चाकरवाडी कडे जाणारा रस्ता, जैतळवाडी ला जाणाऱ्या रस्त्यासह इतर गावांकडे जाणारे कंपनीने काम सुरू असताना खोदलेले रस्ते तयार करून द्यावेत व रस्त्यावर आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत, मांजरसुंबा, नेकनुर, माऊली चौक, येळंब (घाट), नांदुर फाटा, आं.बरड आदी गावांमध्ये बसस्थानक उभारून देण्यासाठी प्रयत्न करुन सर्व प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली आहे.
नाल्या, सर्व्हिस रोड, पथदिवे, दिशादर्शक फलक, अपघात झाल्यास मदतीसाठी रूग्नवाहिका यापैकी कुठलेही काम किंवा सेवा कंपनीकडून देण्यात येत नाहीत. गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांना या कंपनीने वेठीस धरण्याचे काम केलेले आहे आणि आता निकृष्ट दर्जाचे अर्धवट काम असताना देखील दडपशाही करत टोल वसुली सुरू केलेली आहे. त्यामुळे या कंपनीवर कारवाई होणार कि नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
निवेदन देताना अशोक काळकुटे यांच्या सह श्रेयश कदम, शुभम करांडे, प्रदिप रानमारे, विजय कदम आदी उपस्थित होते.
